Saturday, 28 November 2015

जाणुन घ्या :- मोफत शिक्षणाचा अधिकार (Right to education act कलम 21)

Right TO Education Act


“शिक्षण हेच वाघीणीच दुध आहे”, या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र शासनातर्फे सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ४०% अपंगत्व  व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थांना शिक्षणाचा अधिकार या कायद्या द्वारे २५% आरक्षण देण्यात आलेले आहे. हे शिक्षण संपूर्णपणे मोफत असून त्यांचे प्रवेश online करण्यात आले आहे, याची नोंद सर्व पालकांनी लवकरात लवकर करून घ्यावी व त्यानुसार नजीकच्या अधिकृत केंद्रात आपल्या मुलांचा अर्ज भरून घ्यावा.
मात्र अजूनही कित्येक मुले व मुली शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाची आवड असुनुही donation सारख्या system मुळे तरुण पिढीचा कौल चोरी, दरोडा , तस्करी, भिक मागणे, निरक्षरता याकडे वाढत चालला आहे. या साऱ्या वाईट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि देशाच्या Secure  Future साठी “शिक्षणाचा समान अधिकार” हा एकमेव उपाय असल्याचे स्पस्थ झाले आहे. यासाठीच आपण सर्वांनी हि अत्यंत महत्वाची माहिती प्रत्येक गरजू लोकापर्यंत पोहोचवावी, अशी आशा आहे.

जाणुन घ्या :- मोफत शिक्षणाचा अधिकार (Right to education act कलम 21):-


मोफत शिक्षणाचा अधिकार (Right to education act कलम 21) नुसार आपल्या पैकी कुणालाहि आपल्या बालकाचे चांगल्या शाळेत admission करायचे असेल तर डिसेंबर ते मार्च महिन्यात rte25admission.maharashtra.gov.in या site वर admission form भरु शकता. आणि आपल्या जवळच्या योग्य शाळेत आपल्या मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार मिळवून देऊ शकता.

प्रवेश अर्ज सादर करतेवेळी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

1)रहिवाशी पुरावा आधार कार्ड/पास पोर्ट/निवडणूक ओलखपत्र/घरपट्टी/वाहन परवाना यापैकी एक
2) जातीचे प्रमाणपत्र
3)कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला(अनुसूचित जाती ,जमाती, नवबौद्ध,४०% अपंग,यांना उत्पन्नाची अट नाही.
4)जन्माचा दाखला
5)अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
6)बालकाचे छायाचित्र

अट :-

1)  CBSE / State school मध्ये प्रवेशाकरिता online अर्ज स्वीकारण्याचा कालावधी डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६.
2) अनुसूचित जाती आणि जमाती, ४०% अपंगत्व, यांना उत्पनाची अट नाही.
3) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना उत्पन्नाची अट  १,००,०००/-रु आहे.

Please note  :-

कदाचित तुम्ही सध्या ज्या शाळेत तुमच्या बालकांना admission करून दिले आहे. ती सुद्धा RTE अंतर्गत असु शकते,परंतु तुम्ही तिथे मोठ मोठी फ़ीस भरत असाल, म्हणुन एकदा वरच्या website ला नक्की भेट दया..

आपल्या विभागातील प्रत्येक मुलापर्यंत हि योजना पोहोचवावी, हि विनंती.

कारण आपल्या पैकीही ९०% लोकांना या अधिकाराची काहीही माहिती नाही. म्हणून तुम्ही या योजनेच्या प्रचार प्रसाराकरिता हातभार लावावा ही नम्र विनंती.

RTE फोर्म भरणे, आता झाले आहे अगदी सोपे. फोर्म भरताना सर्व माहिती आपोआप मिळत जाते आणि म्हणजे तुमच्या पाल्याचा सबंधित शाळेत नंबर लागला असल्यास तुम्हाला तिथे भांडण करण्याची किंवा काहीही खटाटोप करण्याची गरज नाही.

तुमचा फोर्म हाच तुमचा ठोस पुरावा असेल. त्यामुळे शाळेतील कर्मचार्यांनी काही कीटकीट केलीच कि आपण शाळेची तक्रार शिक्षण अधिकाऱ्याकडे करून शाळेची ग्रंत सुद्धा कडून घेऊ शकतो.

सुचना:- अल्प संख्यांक शाळा सदर उपक्रमात सामिल राहणार नाहीत,सदर योजना ही केवळ 1ली ते 8 वीच्या वर्गांकरिता आहे.( फक्त 6 ते 14 वयोगटासाठी).

Sunday, 22 November 2015

Indian First Lady Doctor – “Rukhmabai Raut”

आज भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची १५१ वी जयंती.

त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी ,तर मृत्यु 25 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे आजोबा ह्यांना ब्रिटीश सरकार कडून "जस्टीस ऑफ पिस” हे सन्मान पत्र मिळाले .कारण ते त्या काळात सत्यशोधक पध्दतीने विवाह लावून देत असत. रखमाबाई 15 वर्षोंच्या असतांना त्यांच्या वडलांचा मृत्यु झाला.

रखमाबाईंचा विवाह

1. डॉ.सखाराम शाहू ह्यांच्याशी झाला. ते जे.जे. हॉस्पीटल ,मुंबई येथे असीस्टंट म्हणून कार्यरत होते. त्यांनी रखमाबाईस शिकवले व 1889 ला MD साठी इंग्लडला पाठवले.

2. त्या 1894 साली ” लंडन स्कूल ऑफ मेडिकल” ची परीक्षा पास झाल्या.

3. त्यांनी महिलांसाठी “वनीता” समाजाची निर्मिती केली.

4. रेडक्रॉस ची गुजरातला शाखा उघडली.

5. 1894 ला मुंबईच्या काया हॉस्पीटल मध्ये त्यांची नियुक्ती झाली.

6. गुजरात मध्ये जेंव्हा प्लेगच्या साथीचा कहर झाला तेंव्हा मालवी हॉस्पीटल मध्ये रुजू झाल्या.

7. पहील्या महायुद्धात जखमी झालेल्या सैनीकांची त्यांनी सेवा केली.

8. त्यामूळे ब्रिटीश सरकारने त्यांना ” कैसर -ए- हिंद ” पुरस्कार दिला.

9. रेडक्रॉसने ही त्यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित केले.

अशी ही पडद्यामागची महानायिका लोकांसमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न , समाजाच्या असल्याने त्या प्रकाश झोतात येऊ शकल्या नाहीत. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याला मन:पूर्वक अभिवादन.

Sunday, 15 November 2015

महत्त्व “एल पी जी सबसिडिचे”u


lpg subsidy

महत्त्व “एल पी जी सबसिडिचे”

कुणीही एल पी जी सबसिडि सोडू नका !!!
दूरदर्शन वर एक हृदयस्पर्शी जाहिरात केली जात आहे…..

सबसिडी : सिलेंडर वरील सबसिडी जास्तीत जास्त गरीब लोकांना मिळण्यासाठी  ज्यांना खरोखर सबसिडीची गरज नाही त्यांनी ती स्वेच्छेने सोडून द्यावी….

का असली अपेक्षा जनतेकडून केली जाते मला कळत नाही….

१२.५ % एक्साइज,
५ %सेल्स टॅक्स ,
३३ %इन्कम टॅक्स,
१४.३६ %सर्विस टॅक्स ,
१.५ % प्रोफेशनल टॅक्स,
१० % लक्झरी टॅक्स,
२% जकात,
३% एलबीटी,

०.५०% स्वच्छ भारत सेस हा नवा टॅक्स दि. १५ नोव्हेंबर,2015 पासुन सर्विस टॅक्समध्ये सामिल केला जाईल.

जवळ जवळ ६५% टॅक्स सरकार लोकांच्या उत्पनातून काढून घेते,

म्हणजे एखादा व्यक्ती किंवा कंपनी १०० रुपये कमवत असेल तर ६४ रुपये सरकार अगोदरच काढून घेते,

भारतातील मोठ मोठ्या कंपन्या करोडो रुपये टॅक्स भरतात……

आणि तरीही पैसा नाही म्हणून टोल वसूल करून विकास केला जातो,

मग हा पैसा जातो कुठे……
साहजिकच राजकीय पुढारी नेते……
आमदार,,
खासदार ,,
नगरसेवक ,,
सगळे मिळून हा पैसा खातात……..

कुठल्याहि पक्षाचा नेता अथवा एकही पक्ष सज्जन साधू नाही…..

प्रत्येक नेत्याची कुंडली काढा……
त्यांचा आज्जा किंवा पणजा
भजी, वडा पाव, विकत होता……
किवा भाजीपाला विकत होता……
किवा कोण पत्रकार होते……
कोणी साधे दुकान चालवत होते……
कोणी शेतकरी होते…….
अचानक अब्जावतीची कमाई एका पिढीने केली कशी…..?????

कोणी ना हिंदूंचे कल्याण केले……
ना बहुजनांचे कल्याण केले……
ना मुस्लीमांचे,
कल्याण त्यांनी त्यांच्या पिढीचे करून घेतले……

आज भारतात असा नगरसेवक, आमदार किंवा खासदार नाही की ज्याच्याकडे ४ व्हीलर नाही……

लाज वाटली पाहिजे जनतेकडून काही अपेक्षा करण्याची……

अरे अगोदर तुम्ही सोडा सगळे चंगळवादी राहणे……

फक्त देशभरातल्या सर्व आमदारांनी व खासदारांनी दर महिना १०% पगार कमी घेतला तर १० वर्षे गॅस सबसिडी मिळेल गरिबांना….

हा संदेश इतका फॉरवर्ड करा की दुरदर्शन ती जाहीरात बंद करेल,
जो फोरवर्ड़ करणार नाही तो नागरीक खरोखर अजुन जागरुक झालेला नाही!
आज आम जनतेची ताकत दाखऊन द्या!!!

source :- http://on.fb.me/1PJiK2r

Saturday, 10 October 2015

How to become a successful Blogger?

 how-to-be-a-successful-blogger

Blogging is a new word & concept for newbie. Most of the freshers want to set their career in Digital Marketing or Digital Media. Some of them are try and give up; because of the complications they have faced during the digital marketing activities. That’s why, i would like to share some simple steps to start your own Blog. My main aim is to help them to achieve their goal, rather than wasting money and time to join the Digital marketing institute.

Major tips to get your Blog live and popular:-


  1.     Select your blogging platform;- such as Blogspot or Blogger, WordPress
  2.     Buy Domain Name according to your Articles Topic.
  3.     Hosting
  4.     Design your blog – by using a simple theme (free or purchased ).
  5.     Change the layout of theme and create custom menu, head section, footer section, logo, etc.
  6.     Choose best plugins for your blog like Google Analytics, Facebook, twitter plugins for your site.
  7.     Your Website is ready now.

Then why are you waiting, just GO & CREATE your own website in a few simple steps.

Wednesday, 23 September 2015

Good News for Future Entrepreneur – ” प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना “

              

आजकाल आपल्या समाजात शिक्षनाचे प्रमान आता खूप प्रमानात वाढले आहे की त्यामुळे सुशिक्षित लोकांना स्व उद्यागाचे महत्व पटू लागले आहे. म्हणूनच शिक्षित तरुण आता ऊद्योग ऊभे करन्याच्या मागे लागत आहेत. त्यांनी इतर शिक्षित तरुणानाही उत्तेजित करणे, महत्वाचे आहे. आणि जेव्हा आपल्या समाजात जिल्हा व तालुका स्तरावर ऊद्योग सुरू होतील तेव्हा प्रत्येक तरुनांना मुंबईत रोजगार शोधन्याची गरजच भासनार नाही. मात्र प्रत्येक जन अडतो तो, आर्थिकदृष्ट्या. परंतु काळजी करन्यास काही कारण नाही कारण स्वताचे ऊद्योग ऊभे करन्याकरीता बँकाचे बर्याच योजना असतात किंवा जिल्हा ऊद्योग  खात्याकडुन बरेच ऊद्योग योजना असतात. त्याची माहीती जिल्हा ऊद्योग केंद्रातुन मिळेल. तसेच पंतप्रधान योजने तुन मुद्रा बँक ही योजना आहे, त्या बद्दल खाली माहीती देत आहोत.


 “मुद्रा बँक “:-


देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने ८ एप्रिल २०१५ रोजी २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड
रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले. या बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. या बँकेच्या मध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल.
मुद्रा बँक योजनेत तीन श्रेणी असतील. त्यांचं
  1.     शिशू,
  2.     किशोर आणि
  3.     तरुण या गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे.

शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज दिले जाणार आहे.

तर किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.
तसेच तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.
मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याचबरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल. पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टरनुसार स्कीम बनवल प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील.
‘सिडबी’ची उप कंपनी या नात्याने मुद्रा बँक ही रिझव्र्ह बँकेकडे बिगर बँकिंग वित्तसंस्था म्हणून नोंदणीकृत होईल आणि रिझव्र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करेल.

मुद्रा योजनेची वैशिष्टय़े……

देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा २०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ सिडबीची ही उपकंपनी रिझव्र्ह बँकेच्या अखत्यारीत येणार सूक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक लोन मध्ये खालील प्रमाणे माहिती आहे

1) कोणत्याही प्रकारचा जामीन नाही
2) कोणत्याही प्रकारचा मॉरगेज नाही
2) हि योजना फक्त सरकारी बैंक तच होते
3) वय 18 वर्षे पूर्ण असली पाहिजेत
4) या साठी ची कागदपत्रे
खालील प्रमाणे
@) ओळखीचा पुरावा उदा – मतदान ओळख पत्र,
आधार कार्ड
@) रहिवासी पुरावा उदा – लाईट बिल, घरफाळा
पावती
@) आपण जो व्यवसाय करणार आहोत कींवा करत
आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता
@) व्यवसायासाठी लागणारे माल मटेरियल किंवा
यंत्रसामुग्री त्याचे कोटेशन व बिले
@) आपण ज्या व्यापार्या कडुन माल घेतला त्याचा पुर्ण नाव व
पत्ता
@) अर्जदाराचे 2 फोटो
@) अर्जदार कोणत्याही बॅन्केचा
थकबाकीदार नसावा इत्यादि
5) कोणतीही सरकारी बॅन्क
कर्ज नाकारू शकत नाही
6) स्वतःचे 10 टक्के भागभांडवलची गरज नाही

हि माहीती प्रत्येकाने काळजी पुर्वक वाचुन आपला ऊद्योग ठरवा , अगोदर बँक मँनेजर लगेच तयार होनार नाही , त्यांना केंद्र सरकारचा पेपर दाखवा आणि तरीही तयार झाला नाही तर त्याच्या बँकेच्या लेटरपँड वर त्याच्याकडुन मुद्रा चे लोन करीत नाही म्हणुन लिहुन घ्या. व ते सर्व पेपर  आम्हाला
isra150413@gmail.com व bhau.1970@rediffmail.com या मेल आय डी वर पाठवा .
नंतर त्या बँक मँनेजर वर काय कारवाई करायचे ते पंतप्रधान कार्यालय ठरविल. परंतु आपल्या सर्व समाज बांधवानी नाऊमेद न होता, उद्योग ध्येयवेडे व्हॉ. आपन कुठेही अडकलाच तर आम्ही इंडियन सोशालिष्ट रिपब्लिकन असोशिएन ची महाराष्ट्र टिम तुमच्या सोबतीला असेलच. तर चला
आजपासुन आपला समाज ऊद्योगपतीचा समाज बनवु या. व आपल्या समाजाला “स्वॉवलंबि समाज ” बनविन्याच्या प्रकियेकडे नेऊ या.

Wednesday, 19 August 2015

Do you Know What was”Watergate scandal”?

If you ever had heard the term “scandal”, you may know that it’s a misuse of position and power of authorities for their self-benefit. In these terms, Political Corruption happen when government employee using power and rights for personal gain. Ex. Watergate scandal.

The “Watergate scandal” (1972 – 1974), was an American political scandal & constitutional crisis that led to the resignation of President Richard Nixon.

The term Watergate refers to the Watergate hotel in Washington, DC. The hotel was the location of the democratic national headquarters in 1972.

A Security Guard caught a handful of burglars breaking into the Democratic Party headquarters. Some of the burglars had ties to the people in the Nixon administration & President Nixon try to minimize the damage of his administration. The resulting cover-up becomes known as “Watergate”.

The scandal came in the political context of ongoing Vietnam War, which had since Lyndon Johnson’s presidency grown increasing unpopular with the American public.

The term Watergate refers to a series of events, spanning over 2- years, which began with Nixon administration’s abuse of power towards the goal of undermining political opposition in the public anti-war movement and the Democratic Party.

Ultimately, the congressional investigation uncovered numerous unethical and illegal activities by people very close to the president.

Through Nixon had endured 2 years of mounting political embarrassment, the court – ordered release at least ‘smoking-fun rape’ in august 1974 brought with it the prospect of certain impeachment for Nixon and he resigned only 4 days later, 9 august, 1974. The scandal also resulted in the impeachment of 69 people, with judgments or appeals resulting in 48 being found guilty and imprisoned, many of whom were Nixon’s top administration officials

But in today’s era, any public scandal, real or exaggerated, can be identified as much simply by attaining the suffix- gate to the word which is the synonymous of Watergate. .

President R.N. staff broke in to the Watergate hotel and stole information from the democrats. For this Nixon would have been accused, and then Nixon resigned.

The reason behind telling this story is India also suffering from so many scams. But there are no action taking by any CBI & others.

We all Indians are actually lucky who are living in democratic country which runs constitution. But the only thing needs to be implement that “Need to follow all the rules and regulation as per our constitution”. This is the reason behind telling this old story once again to you. In which this will help you to overcome from the all issues which we all facing in India.

Saturday, 15 August 2015

Do You Know Your “Fundamental Duties AS an Indian Citizen”?


भारतीय नागरिक म्हणून आपली ही कर्तव्य पार पाडूयात !

1) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

2) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.

3) भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.

4) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेंव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.

5) धार्मिक , भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.

6) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृध्द वारशाचे मोल जाणून तो जतन करणे .

7)  वने , सरोवरे नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे.

8) विद्न्याननिष्ट दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.

9) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.

10) राष्ट्र सतत , उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल  अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे.

11) मातापित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा , यथास्थिती, पाल्याला शिक्षणाची संधी देणे.

जस आपण आपले हक्क/अधिकार सांगतो तसेच आपण आपले कर्तव्य पार पाडने महत्वाचे आहे .

                             संदर्भ:- “भारतीय संविधान” भाग-4, कलम 51 क